पावसाळी अधिवेशनानंतर मतदारसंघातील जनसंवाद सत्र
19
Jul
पावसाळी अधिवेशनानंतर मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद…
आज, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी घाटकोपर येथील संपर्क कार्यालयात विविध भागांतील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकल्या व तत्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या.
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर प्रथमच मतदारसंघातील नागरिकांशी प्रत्यक्ष गाठभेट होऊन त्यांच्या अडचणी समजून घेता आल्या, हे समाधानकारक ठरलं. आपल्या अपेक्षा, अडचणी, सूचना यांवर सकारात्मक तोडगा काढणे हे माझं कर्तव्यच आहे.
जनतेचा विश्वास हीच माझी प्रेरणा आहे. जनतेच्या सेवा आणि समस्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ झाला.










